Revas Reddy Coastal Highway: कोकणवासीयांचे समुद्राशी अतूट नाते आहे. गोवा किंवा इतर फॉरेन बीचेसला आहे मागे सारेल अशी समुद्रकिनारे कोकणाला लाभली आहेत. यात समुद्र किनाऱ्याने प्रवास करता यावा अशी इच्छा कोकण पर्यटकांनी अनेकवेळा व्यक्त करून दाखवली आहे. आता पर्यटकांची हीच इच्छा पूर्ण होणार आहे. कारण की, कोकणातील 93 पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या सागरी किनारी मार्गाचे काम पूर्णत्वाला आले आहे. महामार्गाचे काम लवकर पूर्ण व्हावे आणि मार्ग पर्यटकांना वापरण्यासाठी खुला व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कामाचा वेग वाढवला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवासादरम्यान किनारपट्टीच्या जवळ महामार्गाची योजना आखली आहे रेवस ते रेड्डी या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यास कोकणातील समुद्र किनाऱ्यालगतच्या पर्यटनाला चालना मिळेल. तसेच प्रवासाचा वेग वाढेल आणि पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल. या महामार्गामुळे पर्यटकांना कोकणातील वैभव ही अनुभवता येईल. रेवस ते रेड्डी प्रकल्पासाठी राज्य सरकारने निविदा मागवून घेतल्या आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यातच या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रेवस-रेड्डी सागरी किनारा (Revas Reddy Coastal Highway)
कोकण किनारपट्टीचे दर्शन घडवणारा हा महामार्ग अंदाजे 447 किमी लांबीचा आहे. परंतु मूळ रेवस- रेड्डी मार्ग सलग नसणार आहे. हा महामार्ग आठ खाडीपुल बांधून तयार केला जाणार आहे. रेवस, दिघी, बाणकोट, केळशी, दाभोळ, भाट्ये, वाडातिवरे अशा ठिकाणी खाडीपुल बांधण्यात येईल. हा महामार्ग उभारण्यासाठी 10 हजार कोटी रुपये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महत्वाचे म्हणजे कोकणातील 93 पर्यटकांना हा मार्ग जोडला जाणार आहे.
महामार्ग खुला कधी होणार??
रेवस-रेड्डी सागरी किनारा महामार्गाचे काम पुढील पाच वर्षात होणे अपेक्षित आहे. म्हणजेच 2023 पर्यंत हा महामार्ग प्रवासासाठी खुला होईल. परंतु या मार्गावरून वेगवान प्रवास करता येणार नाही. वळणदार मार्ग आणि खाडी पुल असल्यामुळे गती कमी ठेवावी लागेल.