सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेसाठीचा उमेदवारी अर्ज घेतला मागे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषद निवडणुकीमुले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीला बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न केले जात होते. भाजप मात्र सहाव्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान खोत यांनी आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सदाभाऊ खोत यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता भाजपकडून 6 तर महाविकास आघाडीकडून 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

सदाभाऊ खोत यांनी आपला अर्ज मागे घेतला असल्यामुळे भाजपकडून आता पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. दरम्यान आज विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे या निवडणुकीत कोण कोण अर्ज मागे घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अखेर आज विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी चांगल्याच हालचाली वाढल्या होत्या. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस आमदाराची महत्वाची बैठकही घेतली होती. तर दुसरीकडे भाजपकडून सदाभाऊ खोत यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्यानंतर अखेरच्या क्षणी खोत यांनी अर्ज मागे घेतला. तर राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे येत्या 20 जूनला होणाऱ्या विधान परिषद निवडणुका होणार त्यासाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत.

Leave a Comment