कोरोना काळात गंगेत वाहून गेलेले मृतदेह तुम्हांला मतदान करणार आहेत का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर तोफ डागली आहेत. करोना काळात गंगेत वाहून गेलेले मृतदेह त्यांना मतदान करणार आहेत का? असा टोला राऊतांनी लगावला आहे.

उत्तरप्रदेश मध्ये अराजकता आहे. कोरोना काळात गंगा नदीत लोकांचे मृतदेह आपण पहिले आहेत तरीही भाजपला वाटत असेल कि आम्हाला ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील तर त्यांना काय गांगेतील मृतदेह मतदान करणार आहेत का अशी टीका संजय राऊत यांनी केली, जिवंत लोक तर भाजपला कधीही मतदान करणार नाहीत असेही राऊत यांनी म्हंटल

दरम्यान, अखिलेश यादव यांनी देखील आपले संपूर्ण लक्ष निवडणुकीवर केंद्रीत केले पाहिजे आणि सर्वांना सोबत घेऊन लढाई लढली पाहिजे असा सल्ला संजय राऊत यांनी दिला. लोक फार मोठ्या अपेक्षेने अखिलेश यांच्याकडे पाहत आहेत. अखिलेश, काँग्रेस आणि अन्य भाजपविरोधी पक्ष्यात परिवर्तनाची ताकद असून त्यांना मिळूनच लढावे लागेल असेही राऊत म्हणाले.

Leave a Comment