विधिमंडळातील कालच्या गोंधळाचे राज्यपालच महानायक; संजय राऊत यांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काल विधिमंडळातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात अभिभाषण अर्धवट सोडून राज्यपाल कोश्यारी निघून गेले. त्यामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. काल राज्यपालांनी जे केले आणि त्यानंतर भाजपने जे केले ते ठरवून करण्यात आले. स्क्रिप्टेड हा प्रकार होता. राज्यपालच कालच्या गोंधळाचे महानायक होते,” अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुंबईत सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहार. या अधिवेशनात राज्यपाल भगतसिह कोशारी अभिभाषण न करता निघून गेले. त्याच्या या प्रकाराबद्दल सांगायचे झाले तर कालच्या विधिमंडळातील प्रकार हा पूर्णतः स्क्रिप्टेड असा होता. आणि कालच्या प्रकारातील महानायक हे राज्यपालच होते.

यावेळी राऊत यांनी नवाब मलिक याच्या अटक प्रकरणी प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडी सरकारमधील ते मन्त्र, नेते असल्याने आमचे कर्त्यव्य आहार कि आम्ही त्यांच्या कुटुंबीयांची भेट घ्यावी. म्हणून आम्ही आज त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेली. नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्याचे हे प्रकरण पूर्णपणे बोगस आहे. आपण हे बोगस प्रकरण नक्की बाहेर काढणार आहोत. त्याच्या या प्रकरणाची कागदपत्रेही पंतप्रधान कार्यालयाला देण्यात आली आहेत, असे राऊत यांनी सांगितले.

Leave a Comment