“किरीट सोमय्यांकडून अर्णबला वाचविण्यासाठी अन्वय नाईकला धमक्या”; संजय राऊतांच्या गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज सकाळी रायगड जिल्ह्यातील कोर्लाई गावास रवाना झाले. त्यांच्याकडून तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांच्या जमिनीची पाहणी केली जाणार आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. किरीट सोमय्या पागल झाले आहेत. त्यांना स्वप्नातही बंगले दिसतात. अन्वय नाईकला किरीट सोमय्या यांनी धमक्या दिल्या असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, एक मराठी उद्योजक असलेल्या अन्वय नाईकला भाजप नेत्यांनी धमक्या दिल्या आहेत. किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईकला दोनवेळा बोलावून धमक्या दिल्या आहेत. त्या केवळ अर्णब गोस्वामीला वाचवण्यासाठी. भाजपच्या दबावामुळे अन्वयने आत्महत्या केली.

किरीट सोमय्या हे पागल झाले आहेत. त्यांना वेड लागले आहे. त्यांना स्वप्नातही बंगले दिसतात. ते नक्कीच जेलमध्ये जाणार आहरेत. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगाही जेलमध्ये नक्की जाणार आहेत, अशी टीका राऊत यांनी किरीट सोमय्या व भाजप नेत्यांवर केली.

Leave a Comment