SBI देतेय ४५ मिनिटांत स्वस्तात कर्ज, ६ महिने EMI भरण्याची गरज नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउन दरम्यान अशी शक्यता आहे की आपल्याला पैशाची आवश्यकता भासेल.ही गोष्टी लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियाने आता तुमच्यासाठी आपत्कालीन कर्ज सुरू केले आहे.यासाठी या लॉकडाउन दरम्यान आपल्याला घराबाहेर पडण्याची देखील आवश्यकता नाही. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला फक्त ४५ मिनिटांत हे कर्ज मिळेल.

६ महिने ईएमआय देण्याची गरज नाही
स्टेट बँक ऑफ इंडियाने केवळ वेतन कपात आणि व्यवसायावर होणाऱ्या परिणामांमुळे ग्राहकांसाठी हे कर्ज सुरु केले आहे. हे आपत्कालीन कर्ज केवळ एसबीआय ग्राहकांसाठीच आहे. कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना पुढील ६ महिन्यांसाठी हप्ते देण्याची गरजही नसल्याचे बँकेने म्हटले आहे.यासाठीचा ईएमआय हा ६ महिन्यांनंतर सुरू होईल.

सर्वात स्वस्त कर्ज
एसबीआयने हे नवीन कर्ज फक्त आपल्या बँक ग्राहकांसाठीच सुरु केले आहे. या वैयक्तिक कर्जासाठी ग्राहकांना फक्त १०.५० टक्केच व्याज द्यावे लागेल.जे देशातील इतर कोणत्याही बँकेच्या व्याजापेक्षा खूपच स्वस्त आहे.

अर्ज कसा करावा
ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत क्रमांकावरून ५६७६७६ वर पीएपीएल <खाते क्रमांकाचे शेवटचे ४ अंक> पाठवावे लागतील.आपण कर्जासाठी पात्र आहात की नाही हे आपल्याला मेसेजमध्ये सांगितले जाईल.

पात्र ग्राहकांना चार प्रक्रियांमध्ये कर्ज मिळेल
– अ‍ॅपमधील Avail Now वर क्लिक करा
– नंतर कालावधी आणि रक्कम निवडा
– रजिस्टर्ड नंबरवर ओटीपी येईल. पैसे टाकताच आपल्या खात्यात पैसे जमा होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment