पवारांनी ज्यांना ज्यांना जवळ केलं त्यांना काखेत घेऊन मारलं ; शहाजी पाटलांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काय झाडी, काय डोंगर आणि हॉटेल या अस्सल गावरान भाषेमुळे चर्चेत आलेले बंडखोर आमदार शहाजी पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर जोरदार टीका केली. पवारांनी ज्यांना ज्यांना जवळ केलं त्यांना काखेत घेऊन मारलं अशा शब्दांत त्यांनी पवारांवर हल्लाबोल केला.

वसंत दादा माझे वडिल आहेत, त्यांच्याच आशीर्वादाने मी मोठा झालेलो आहे आणि मी वसंत दादांना कधीच दगा देणार नाही अस शरद पवार म्हणाले होते. आणि त्यानंतर तिथेच बातमी आली की, शरद पवारांनी बंड केलंय. 40 आमदार घेऊन काँग्रेसचं पळून गेलं. लगेच वसंत दादांनी राजीनामा दिला हा इतिहास शहाजी पाटील यांनी सांगितला.

एवढ होऊनही वसंतराव पाटील त्यांच्या कार्यकर्त्यांना पवारांच्या सोबत राहण्यास सांगितले होते. मात्र, जे कार्यकर्ते त्यांच्या सोबत राहिले ते कुठेच नाहीत. विलासराव देशमुख आणि सुशिलकुमार शिंदे हे राजीव गांधी यांच्याकडे पळून गेले त्यामुळे ते वाचले. त्यामुळे शिंदेसाहेब तुम्ही काहीही करायला सांगा पण पवारांच्या जवळ नेऊ नका, नाहीतर आपण मेलोच, अस शहाजी पाटील म्हणाले.

Leave a Comment