महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत शरद पवारांनी केले ‘हे’ आवाहन; म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांशी संवाद साधला. यावेळी सर्वांनी महाविकास आघाडीच्या चारही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. आमदारांनो आपली एकी दाखवा आणि मतदान करताना काळजी घ्यावी, असे आवाहन शरद पवारांनी बैठकीत आमदारांना केले.

मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत 12 अपक्ष आमदारांसह काँग्रेसचे 32, शिवसेनेचे 45, राष्ट्रवादीचे 42 आमदार उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले कि, कोणी कितीही काहीजरी प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार खासदार म्हणून दिल्लीत जाणारच. आणि आपण सर्वजण त्यांना त्याठिकाणी पाठवू. 24 वर्षांनी निवडणुका होत आहेत. शेवटची निवडणूक कधी झाली हे आपल्याला आठवावे लागते.

महाराष्ट्रातील राजकारणात एक परंपरा होती. ती पाळायला हरकत नव्हती. खरंतर ही एक विचित्र गोष्ट आहे. सभ्यता आणि राजकारण या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी आहेत. मात्र, राजकारणात संभ्यता पाळायला हरकत नव्हती,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Comment