भाजपला 5 पैकी एकाच राज्यात सत्ता मिळवता येईल ; शरद पवारांचा एक्झिट पोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या देशात पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक जोरदार चर्चेत आहे. ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपा असा थेट सामना रंगणार असून काहीही करून पश्चिम बंगालचा गड काबीज करायचाच हा भाजपचा प्रयत्न आहे. दर दुसरीकडे ममता बॅनर्जी देखील एखाद्या वाघिणी प्रमाणे लढा देत आहेत. दरम्यान काहीही झालं तरी पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसचाच विजय होईल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

शरद पवार म्हणाले, बंगालमधील नागरिक हे स्वाभीमानी आहेत. बंगाली संस्कृतीवर आघात करण्याचा प्रयत्न कोणी केला तर संपूर्ण बंगाल एकसंध होतो. कोणी काही म्हणाले तरी बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल, याची मला खात्री आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटल.

सध्या पाच राज्यामध्ये विधानसभा निवडणुका लागल्या आहेत. यापैकी केवळ आसाममध्ये भाजप सत्ता राखण्यात यशस्वी होईल. मात्र केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल इतर पक्षांना यश मिळेल. पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल हे देशाला नवी दिशा देणारे ठरतील असेही पवार म्हणाले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment