नारायण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी….; राऊतांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवरून आता महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान, शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. “जन आशिर्वाद हा शब्द शिवसेनेचाच असून भाजपने तो चोरला आहे, असे सांगत नारायण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, अशी टीका खासदार राऊत यांनी केली आहे.

खासदार राऊत यांनी टीका करताना म्हंटले आहे की, जन आशीर्वाद हा शब्द शिवसेनेचाच आहे, भाजपने हा शब्द चोरला असून राज्यात भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले म्हणून भाजपने जन आशीर्वाद यात्रा काढली होती. आता चार मंत्र्यांना घेऊन या यात्रेच्या माध्यमातून भाजप त्यांचा राज्यातील ग्राफ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यात त्यांना यश मिळणार नाही, असा टोला राऊत यांनी यावेळी लगावला आहे.

दरम्यान, भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेत पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनीही भाजपमधी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्यावर टीका करीत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे भाजपमढील कार्यकर्त्यांची नाराजी समोर आली आहे. यानंतर आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेवरून निशाणा साधला आहे.

Leave a Comment