राणेंच्या अॅसिड हल्ल्याच्या आरोपांवर सामंतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या जन आशीर्वाद यात्रेतून भाजपनेते तथा कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी शिवसेनेला इशारा देताना “भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं? रमेश मोरे, जया जाधवची हत्या कशी झाली? आम्हालाही जुनी प्रकरणं माहिती आहेत, असे म्हंटले. त्यावर शिवसेना नेते उदय सामंतांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेवर टीका केल्यानंतर मंत्री नारायण राणे पुन्हा शिवसेनेवर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी त्यांनी पुन्हा शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यावर शिवसेना नेते उदय सामंत यांनी राणेंच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया दिली. “कोणीही वैयक्तिक टीका करणे बरोबर नाही. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चूकीची विधाने बोलाल तर कोणताच शिवसैनिक सहन करणार नाही. आमच्यासाठी उद्धव ठाकरे दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल काहीही बोलू नये, एक्शनला रिएक्शन मिळणारच. मुख्यमंत्री ठाकरेंवर जर पुन्हा टीका झाली तर त्याचे परिणाम हे काय होतील हे सर्वांनी पाहिले आहे, असे सामंतांनी सांगितले.

कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी आपल्या तीन दिवसांच्या जन आशीर्वाद यात्रेला रत्नागिरीतून सुरुवात केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर घणाघाती टीकाही केली होती. आता पुन्हा नारायण राणे व मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील टीकेचा वाद सुरु झाला आहे.

Leave a Comment