पालघरप्रमाणे यूपीतील साधूंच्या हत्येचं राजकारण करू नका! संजय राऊतांचा भाजपला टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । उत्तर प्रदेशात दोन साधूंची हत्या झाल्याचं वृत्त आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्ष हल्ला केला आहे. उत्तर प्रदेशातील साधूंच्या हत्येचं पालघरप्रमाणे राजकारण करू नका. देश कोरोनाशी लढत आहेत. मुख्यमंत्री आदित्यनाथ हल्लेखोरांवर कठोर कारवाई करतीलच, असा उपरोधिक टोला राऊत यांनी ट्विटवरून भाजपला लगावला आहे.

आपल्या ट्विटमध्ये राऊत यांनी लिहलं आहे, ”उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील मंदिरात दोन साधूची हत्या झाली आहे. हे अत्यंत निघृण आणि अमानुष आहे. पण सर्व संबंधितांनी या विषयाचं पालघरप्रमाणे राजकारण करू नये. देश करोनाशी लढत आहे. शांतता राखा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतीलच,” असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.

पालघरमधील गडचिंचले या गावात चोर आल्याची अफवा उठल्याने जमावाने दोन साधू आणि आणि एका ड्रायव्हरची हत्या केली होती. या घटनेला धार्मिक रंग देत त्यावरून भाजपने राज्यातील उद्धव ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून याबाबतची माहिती घेतली होती. आता उत्तर प्रदेशातच दोन साधूंची हत्या करण्यात आल्याने राऊत यांनी ट्विट करत भाजपला कात्रीत धरत त्यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment