…तर आम्हालाही झिंगाट दाखवावा लागेल” मनसेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : प्रसिद्ध अशा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन सध्या जीव्हीके कंपनीकडून अदानी समूहाकडे देण्यात आले आहे. व्यवस्थापनाचा एकूण 74 टक्के हिस्सा आदा अदानी समूहाकडे आला आहे. या निर्णयानंतर अदानी समूहाचे काही कर्मचाऱ्यांनी गरबा केला. यावरून मनसेच्यावतीने अदानी समूहाला इशारा देण्यात आला आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी ट्विट करीत “आम्हाला डीवचण्यासाठी गरबा कराल तर आम्हालाही आमचा झिंगाट दाखवावा लागेल,” असे म्हंटले आहे.

मुंबईत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा व्यवस्थापनाचा ताबा अदानी समूहाकडे देण्यात आला आहे. हा ताबा मिळाल्यानंतर समूहातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा ताबा मिळताच अदानी उद्योग समूहाने आपले मुंबईतील मुख्यालय हे गुजरातला हलवले आहे. त्यातच सोशल मीडियात सुद्धा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओत अदानी समूहाचे काही कर्मचारी गरबा करताना दिसताहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत मनसेच्यावतीने प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

मसनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी या प्रकरणी ट्विट केले असून त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे कि,” फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलय …विमानतळ मुंबईमध्येच आहे …. आम्हाला डीवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर आम्हालाही आमचा ‘झिंगाट’ दाखवावा लागेल.” मुंबई विमानतळावरून जीव्हीकेचे चे रेड्डी गेले आणि अदानी आले. व्यवस्थापन कोणाचे ही असो पण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘आवाज’ हा मराठी माणसाचाच असेल हे लक्षात असू द्या,” असे सरदेसाई यांनी अदानी समूहाला ठणकावून सांगितले आहे.

Leave a Comment