राणेंच्या मुलांसारखी मुले कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार भास्कर जाधव आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यातील वाद काही नवा नाही. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणेंच्या दोन्ही सुपुत्रांकडून भास्कर जादहव यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर तिया केली जात आहे. दरम्यान आता भास्कर जाधव यांनीही राणे कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नारायण राणेंच्या मुलांसारखी मुले कोणाच्या पोटी जन्म घेऊ नये अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे

राजकारणामध्ये पक्ष वेगवेगळे असू शकतात,मतमतांतर वेगळी असू शकतात पण आपण कोणती भाषा कोणाबद्दल वापरतो याचं अजिबात भानं त्यांना नाही. आपण कोणाबद्दल काही भाषा वापरायची पण दुसऱ्याने त्याचा प्रतिवाद करायचा नाही. अशी जी मुलं आहेत किंवा नारायण रावांबद्दल बोलायला मला इच्छा सुद्धा होत नाही,” असं भास्कर जाधव म्हणाले.

नारायण राणेंना माध्यमांनी मोठं केलं. त्यांचा काहीही करिष्मा नाही. त्यांनी आपला पक्ष काढला आणि त्याचा वर्धापन दिन साजरा करण्याऐवजी वर्ष पूर्ण होण्याआधी त्याचं वर्षश्राद्ध घातलं. स्वतःच्या मुलाला निवडूण आणू शकत नाही म्हणून भाजपाच्या दरवाजात जाऊन उभे राहिले. ते काय शिवसेनेला शिव्या देणार असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.

Leave a Comment