पतीच्या निधनानंतर काही वेळातच पत्नीनेही सोडला जीव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर | 47 वर्षापासून संसारात साथ देणाऱ्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी सकाळी निधन झाले. हे कळताच दुःख सहन न झाल्याने अवघ्या काही वेळातच पत्नीनेही प्राण सोडला. ही हृदयद्रावक घटना (उस्तुरी ता.निलंगा) येथे घडली आहे. पती-पत्नीचा एकाच दिवशी मृत्यू झाला आणि एकाच दिवशी आई-वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ मुलांवर आली यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

उस्तुरी येथील सिद्रामप्पा ईटले व ललिता ईटले यांनी शेती करुन आपला उदरनिर्वाह भागविला. सांप्रदायिक संस्कार असलेल्या या पती-पत्नीने 47 वर्षांत अनेक चढउतार अशा प्रसंगांना सामोरे जाऊन आपला सुखात संसार थाटला होता. या दांपत्याला चार मुले आहेत.

6 जून रोजी सर्वात लहान मुलाचे लग्न करून देत आपले सर्व कर्तव्य या दाम्पत्यांनी पूर्ण केले. मात्र दिनांक 15 जुलै रोजी सकाळी 8 वाजता सिद्रम्प्पा यांना हृदयविकाराचा झटका आला. आणि ते जमिनीवर पडले त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आपल्या पतीचे मृत्यू झाल्याचे समजताच ललिताबाई यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी ही शेवटचा श्वास घेतला.

Leave a Comment