येस बँकप्रकरणी ठेवीदार, गुंतवणूकदारांना सीतारामन यांचा दिलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येस बँक बुडीत गेल्याची बातमी शुक्रवारी बाहेर आली आणि देशातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. ठेवीदार, गुंतवणूकदार आणि प्रत्यक्ष बँकाही या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन रजनीश कुमार आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँक यासंदर्भात आवश्यक ती पावले तातडीने उचलत असल्याचं कुमार म्हणाले आहेत. तर ठेवीदार, गुंतवणूकदार आणि बँकांनी काळजी करु नका असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे.

दरम्यान, देशातील सर्वोच्च अशा रिझर्व्ह बँकेकडून येस बँकेचे संचालक मंडळ गुरुवारी बरखास्त करण्यात आले. आर्थिक संकटात असलेल्या येस बँकेने आर्थिकदृष्ट्या सक्षम पुनर्उभारणी घेण्याबाबतचा विश्वासार्ह आराखडा सादर केला नाही. त्यामुळे बँकेविरुद्ध कारवाई करावी लागल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे. बँकेकरिता भांडवल उभारण्यासाठी सुरू असलेल्या बँक व्यवस्थापनाच्या चर्चेला गती न मिळाल्याने हे पाऊल उचलावे लागत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातल्यामुळे बँकेच्या खातेदारांना महिन्याभरात ५० हजार रुपयांपर्यंतच रक्कम काढता येणार आहे. त्यापेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेची विशेष मंजुरी घ्यावी लागेल. अपवादात्मक परिस्थितीत वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्नासाठी हे पैसे काढता येतील. या निर्णयामुळे पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँकेपाठोपाठ (पीएमसी) आर्थिक संकटात असणाऱ्या येस बँकेला घरघर लागल्याचे स्पष्ट झाले आहे. रिझर्व्ह बँकेकडून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे खातेदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment