एमपीएससी परीक्षेला सहा हजार विद्यार्थ्यांची दांडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार पदासाठी आज सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ५ या दोन सत्रांत परीक्षा घेण्यात आली. यावेळी परीक्षेला दोन्हीही सत्रांत तेरा हजारांहून अधिक परीक्षार्थींनी परीक्षा दिली तर सहा हजार विद्यार्थ्यांनी दोन्ही सत्रांत दांडी मारली.

औरंगाबाद शहरातील एकूण ५९ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली त्यात एमपीएससी परीक्षेसाठी एकूण १९ हजार ६४६ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. यंदा कोरोनाचे सावट असल्याने त्यात विकेंड लॉकडाऊन असल्याने त्याचा देखील परिणाम दिसून आला. अनेकांनी परीक्षेकडे पाठ फिरवून परीक्षेला दांडी मारली. त्यामुळे १९ हजार ६४६ परीक्षार्थींपैकी सकाळी १० ते १२ या वेळेत पहिल्या सत्रात एकूण १३ हजार ३४६ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. ६ हजार ३०० परीक्षार्थींनी परीक्षेला दांडी मारली.

पहिल्या सत्रात एकूण ६७.९३ % परीक्षार्थींनी हजेरी लावली, तर दुपारी ३ ते ५ या वेळेत घेण्यात आलेल्या दुसऱ्या सत्रात एमपीएससी परीक्षेला देखील १९ हजार ६४६ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. त्यातही असेच चित्र दिसून आले. त्यामध्ये १३ हजार ६२७ परीक्षार्थींनी परीक्षा दिली, तर ६ हजार १९ परीक्षार्थींनी परिक्षेकडे पाठ फिरवली. दुसऱ्या सत्रात ६९.३६ % परीक्षार्थींनी हजेरी लावली असल्याची नोंद एमपीएससी परीक्षा विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment