राहुल गांधींनी शेतकऱ्यांच्या जमिनी खाल्ल्या – स्मृती इराणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी । ”काँग्रेस चे राहुल गांधी म्हणतात त्यांना शेतकऱ्यांची चिंता आहे. मात्र अमेठी मध्ये जाऊन शेतकऱ्यांना विचारा.राहुल गांधींनी तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी खाल्या” अशी घणाघाती टीका केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री आणि ‘भाजपा’च्या स्टार प्रचारक स्मृती इराणी यांनी केली आहे. श्रीगोंदा येथे बबनराव पाचपुते यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार सुजय विखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान स्मृती इराणी यांनी आपल्या भाषणात ३७० कलम हटवल्याचे जोरदार समर्थन करताना काँग्रेस पक्षाला निशाण्यावर घेतले. तसेच ‘राष्ट्रवादी’ने आणि ‘काँग्रेस’ने महाराष्ट्रातील जनतेची लूट केली आहे अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

दरम्यान ‘ज्या शेतकऱ्यांनी पाणी मागितलं. त्यांच्या छातीवर गोळ्या झाडल्या. त्याला महाराष्ट्रातील जनता माफ करू शकत नाही.’ असे त्यांनी म्हणले आहे. दरम्यान यावेळी त्यांनी ‘पाणी प्रश्नावर अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्या’चा देखील त्यांनी आठवण करून दिली.

Leave a Comment