सोलापूर जिल्ह्यात ‘त्या’ चार गावांचा मतदानावर बहिष्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी। मोहोळ विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील तारापूर, वीटे, पोहरगाव, खरसोळी या चार गावांना आज ही पक्का डांबरी रस्ता नाही. त्यामुळं या चार गावातील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. या संदर्भात सदर चारही गावातील सरपंचानी एकत्रित येत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. येथील गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोर जाव लागत आहे.

पंढरपूरकडे येण्यासाठी सदरच्या चार गावांना एकच रस्ता आहे. गावातील १५०० विद्यार्थी माध्यमिक व महाविद्यालयाचे शिक्षण घेण्यासाठी सुस्ते व पंढरपूरला जाव लागत; मात्र हा रस्ता खराब असल्यान वेळेत एसटी येत नाही. घरी परत येण्यास वेळ होत असल्यान या भागातील तरुणांना उच्च शिक्षणापासून वंचित रहाव लागतय. खराब रस्त्यामुळ अपघाताच प्रमाण वाढल आहे. अचानक एखाद्या रुग्णास पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी न्याव लागत; मात्र रस्त्यावर जागोजागी खड्डे असल्यान रुग्ण वेळेत रुग्णालयात दाखल होत नाहीत. अनेकवेळा रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच जीव गमवावा लागतो.

गेल्या वीस वर्षांपासून या चार गावच्या गावातील नागरिकांना या रस्त्यावरून खडतर प्रवास करावा लागतो आहे. या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी अनेक वेळा ग्रामपंचायतीन ठराव देऊनसुद्धा कोणत्याही प्रकारची संबंधित विभागाकडून दखल घेण्यात आली नाही. तसेच यापूर्वी अनेक नेतेमंडळींकडे रस्त्याची मागणी केली असता, नेत्यांनी ठोस निर्णय घेतला नसल्यान या रस्त्याच नूतनीकरण झाले नाही. रस्त्यावरून जात असताना अनेकांना कमरेचे, मणक्याचे आजार झालेत. या खराब रस्त्यामुळ अनेक निष्पाप लोकांचे जीव गेलेत. त्यामुळं आता या गावच्या सरपंचांनी एकत्र येऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment