धक्कादायक ! ओढ्यातील पाण्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आष्टी या ठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये ऊसतोड कामगारांच्या तीन अल्पवयीन मुलांचा ओढ्यातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुरेखा हिरामण गायकवाड, रेणुका अंकुश जाधव, अजय बाळू जाधव अशी या मृत मुलांची नावे आहेत. ऊसतोड कामगार ऊसतोडीच्या कामासाठी गेले असताना दोघी मुली‌ आणि एक मुलगा असे तिघेही आष्टी येथील ओढ्यात कपडे धुण्यासाठी गेले होते. यादरम्यान या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू ‌झाला‌. हि दुर्दैवी घटना काल दुपारी घडली.

काय घडले नेमके ?
घटनेच्या दिवशी ऊसतोड कामगार ऊसतोडीच्या कामासाठी गेले होते. यावेळी दोघी मुली‌ आणि एक मुलगा असे तिघेही आष्टी येथील ओढ्यात कपडे धुण्यासाठी गेले होते. यादरम्यान या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल दुपारच्या सुमारास घडली.

तिघांचा मृत्यू
ही दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आष्टी या ठिकाणी घडली आहे. सुरेखा हिरामण गायकवाड, रेणुका अंकुश जाधव, अजय बाळू जाधव अशी मृत मुलांची नावे आहेत.

Leave a Comment