हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इयत्ता १० वीच्या निकालाबाबत (SSC Result 2025 Maharashtra Board) मोठी माहिती समोर आली आहे. यंदा दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला असून दरवर्षी प्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आज पत्रकार परिषद घेत १० वीच्या बद्दल संपूर्ण डिटेल्स सांगितली आहे. यावर्षी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.८२टक्के लागला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर विभाग सर्वात खाली गेला आहे. नागपूर विभागाचा निकाल ९०.७८ लागला आहे.
यंदा राज्यभरातून १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी १० वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १५,४६,५७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १४,५५,४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या काही वर्षांप्रमाणेच यंदाही निकालात विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांचे सरासरी यश दरवर्षी सुधारत चालल्याचे शिक्षण मंडळाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. एकूण टक्केवारी ९४.१० राहिली आहे. यंदा ९,५८५ दिव्यांग विद्यार्थ्यांनी १० विचा पेपर दिला त्यातील ८,८४४ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.२७ आहे.
कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के लागला?
पुणे -९४.८१ टक्के
नागपूर- ९०.७८ टक्के
छत्रपती संभाजीनगर- ९२.८२ टक्के
मुंबई-९५.८४ टक्के
कोल्हापूर- ९६.७८ टक्के
अमरावती-९२.९५ टक्के
नाशिक- ९३.०४ टक्के
लातूर-९२.७७ टक्के
कोकण- ९९.८२ टक्के (SSC Result 2025 Maharashtra Board)
खालील वेबसाईटवर पहा 10 वीचा निकाल- SSC Result 2025 Maharashtra Board
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन –
दहावीची निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांची अकरावीच्या प्रवेशासाठी वेगवेगळ्या कॉलेजच्या पायऱ्या चढावा लागतात. विद्यार्थी आणि पालक यांची ही गैरसोय आणि धावपळ टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाने महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र बोर्डाने यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे. अकरावी प्रवेशासाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ Mahafyjcadmissions.in याचा वापर पालक आणि विद्यार्थ्यांनी करावा असं आवाहन महाराष्ट्र बोर्डाने केला आहे.




