पालिकेला निवेदन : मासाळवाडी- म्हसवड रस्त्याचा प्रश्न न मिटल्यास राष्ट्रवादी आंदोलन करणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दहिवडी | मासाळवाडी ते म्हसवड दरम्यान काही ठिकाणी रस्त्याची खूपच दयनीय अवस्था झालेली आहे. तसेच या मार्गात मोठ मोठे खड्डे यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला गेला आहे. त्यामुळे या मार्गात लोकांना प्रवास करणे खुपच अवघड होऊन बसले आहे.

मासाळवाडी- म्हसवड या रस्त्याची दुरावस्था अतिशय बिकट झाली असून यामुळे मासाळवाडी गावातील शेतकरी विद्यार्थी नोकरदार वर्ग यांना म्हसवड येत असताना व प्रवास करताना खराब रस्त्यामुळे त्रासून त्रास सहन करावा लागत आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. प्रवाशांना खड्डातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे अपघाताचा धोका देखील वाढला आहे. निकृष्ट दर्जाच्या कामची सर्व चौकशी झाली पाहिजे.

रात्री प्रवास करताना अनेक ठिकाणी अपघात सुद्धा होत आहेत तरी प्रशासनाने लवकर लक्ष घालून या रस्त्याचा प्रश्न मिटवला पाहिजे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन राष्ट्रवादीचे नेते आनंद मासाळ यांनी म्हसवड नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment