पालकमंत्री सुभाष देशमुखांनी फिरवली दुष्काळी जत तालुक्याकडे पाठ

0
40
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळाच्या झळा बसणाऱ्या जत तालुक्यात बसत आहे, परंतू जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जत तालुक्याकडे पाठ फिरविली. आटपाडी आणि कवठमहांकाळ तालुक्यात जावून परिस्थितीची माहिती घेतली, त्यामुळे जत तालुक्यातील शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात दुकाळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, मिरज आणि तासगाव तालुक्यात चारा आणि पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने या तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळ जाहीर करून उपायोजना सुरू केल्या आहेत. पाण्यासाठी टँकर सुरू केले आहेत, तर चाऱ्यासाठी छावण्या सुरू करण्यात येत आहेत. यासह इतर उपायोजनाचे करण्यात येत आहेत. असे असताना मुखमंत्र्यांच्या आदेशानुसार पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्ह्यातील दुष्काळ भागाचा धावता दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी आटपाडीतील चारा छावणी आणि कवठेमहांकाळ येथील ढालगाव भागात भेट दिली. मात्र ढालगाव पासून अवघ्या पंधरा किमीवर असलेल्या जत तालुक्यात त्यांना जाण्यास त्यांना वेळ मिळाला नाही.

पालकमंत्र्यांनी एकप्रकारे कायमस्वमी जत दुष्काळी असलेल्या जत तालुक्याकडे दुर्लक्षच त्याच्या प्रतिक्रिया या भागातीत शेतकऱ्यांतून उमटत आहेत. तसे पाहिले तर सध्यस्थितीतील दुष्काळी बनती गंभीर परिस्थिती पाहता पालकमंत्र्यांनी दुष्काळी भागातील प्रत्येक गावात जाऊन तेथून अडचणी समजावून घेवून उपायोजना राबविण्याबाबत सूचना करण्याची गरज होती मात्र निवडणूकीत गुंग असलेल्या या राजकर्त्यांना दुष्काळाचे गांभीर्य कधी कधी येणार हा सवाल केला जात आहे. दुष्काळी भाग सरकारच्या पाठीशी राहिला आहे. असे असताना जतसारख्या भागाकडे सरकार आणि त्यांचे मंत्री दुर्लक्ष का करीत आहेत असा प्रश्न जनेतला पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here