सुनीता विल्यम्सची अंतराळातच वाफ होऊन मृत्यू होऊ शकतो ? NASA तज्ज्ञाचा मोठा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या सध्या अंतराळात गेलेल्या आहेत. या आधी देखील त्यांनी अनेकवेळा अंतराळवारी केलेली आहे. यावेळी त्या बुच विल्मोर यांच्यासोबत गेलेल्या आहेत. परंतु पृथ्वीवर परत येण्याच्या त्यांच्या प्रवासात सध्या अनेक अडचणी येत आहेत. त्या केवळ आठ दिवसांसाठी अंतराळवीरात गेल्या होत्या. परंतु त्यांचा हा मुक्काम गेल्या दोन महिन्यापासून तिथेच आहे. हाती आलेल्या माहितीनुसार त्यांच्या वाहनात तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे त्यांच्या परतीचा प्रवास लांबलेला आहे. तसेच त्यांना कॉर्नियाचा देखील आजार झाल्याचे उघड झालेले आहे. परंतु अशातच नासाने त्यांच्या या प्रवासा संदर्भात एक मोठी बातमी समोर आणलेली आहे.

सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे परत येणार होते. परंतु त्याच्या त्यांच्या कॅप्सूल थस्टरमध्ये बिघाड झाली. त्यामुळे त्या नक्की पृथ्वीवर कधी परतणार आहेत?याची माहिती अजून मिळालेली नाही. तसेच अनेक लोकांनी त्यांच्या परत येण्याबाबत शंका देखील व्यक्त केलेल्या आहे. त्यामुळे त्या परत येतील की नाही? या गोष्टीची चिंता आता संपूर्ण भारतीयांना सतावत आहे. अशातच आता माझी अमेरिकी लष्कर अवकाश प्रणाली कमांडक रुडी रिडल्स यांनी काही शक्यता व्यक्त केलेल्या आहेत. आणि त्यांच्या येण्याबाबतचे संभाव्य धोके सांगितलेले आहेत.

त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार स्टार लायनरच्या सुरक्षित परतीच्या प्रवासासाठी त्याच्या सर्विस मॉड्युच्या कॅप्सूलला योग्य दिशेने ठेवणे गरजेचे असते. यामध्ये थोडीशी जरी चूक झाली तरी धोका निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्टार लाइनर व्यवस्थित अपेक्षित ठिकाणी ठेवलं गेलं नाही, तर पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतेवेळी ते पेट देखील घेऊ शकते. आणि अवकाशाच्या मागच्या बाजूला फेकले जाऊ शकते. त्यामुळे परतीच्या प्रवासाबाबत हे धोके निर्माण होऊ शकतात. यातील पहिला धोका म्हणजे चुकीच्या कोनामध्ये ठेवूनच या स्टार लाइनरचा प्रवास सुरू केला, तर तो वातावरणात पुन्हा मागच्या दिशेने जाऊ शकतो. असे केल्याने ते लोक अंतराळातच अडकू शकतात.

त्याचप्रमाणे हे यान पेट घेण्याची देखील शक्यता वर्तवलेली आहे. हे या अतिरिक्त घर्षणामुळे पेट घेऊ शकते. आणि अंतराळवीरांचi तिथे राख होऊ शकते त्यांचा वापर होऊ शकते असे देखील सांगण्यात आलेले आहे. हे सगळे धोके लक्षात घेता आता ना असा अतिशय सावधानगिरीने निर्णय घेत आहे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना सुरक्षित पृथ्वीवर आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न देखील करत जात आहे. परंतु आता नक्की त्यांच्या प्रयत्नांना कशाप्रकारे यश येत आहे. हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे.

सुनिता विल्यम्स यांनी याआधी देखील अंतराळ प्रवास केलेला आहे. परंतु त्यावेळी त्यांचे सगळे प्रयत्न यशस्वी झालेल्या होते. परंतु या प्रयत्नात त्या अंतराळात सुरक्षित गेलेल्या आहेत. परंतु आता त्यांना परत पृथ्वीवर येण्यासाठी अनेक धोके निर्माण होत आहे. त्यांच्या यानात बिघाड झाली आहे. त्याचप्रमाणे त्यांना कॉर्नियाचा आजार झाल्याचे देखील समोर आलेले आहे. त्यामुळे त्यांच्या या संकटांमध्ये वाढ झालेली दिसत आहे. परंतु आता नासा या दोघांबाबत काय निर्णय घेतात. आणि त्यांना पृथ्वीवर कशाप्रकारे परत आणू शकतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.