चिंताजनक! राज्यात करोनाचा चौथा बळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाचा चौथा बळी गेला आहे. कस्तुरबा रूग्णालयात दाखल असलेल्या एका ६५ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांना काल संध्याकाळपासून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होत होता. दरम्यान आज या रुग्णाचा उपचार करत असताना मृत्यू झाला आहे. Maharashtra: A 65-year-old Coronavirus patient from UAE passed away in Mumbai yesterday. He … Read more

खुशखबर! पुण्याच्या ‘या’ लॅबने बनवले स्वदेशी कोरोना टेस्टिंग किट, आठवड्यात तयार करणार १ लाख किट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) कोरोना व्हायरस चाचणीसाठी भारत निर्मित पहिल्या किटच्या चाचणीला मान्यता दिली आहे. पुणेस्थित मायलॅबला ही जबाबदारी देण्यात आली आहे. मायलॅबने एका आठवड्यात १ लाख किट निर्मिती करण्याचे आश्वासन दिले आहे. एका किटमध्ये १०० रूग्णांची तपासणी करता येते, असा कंपनीचा दावा आहे. पुणेस्थित कंपनी मायलॅबने ६ आठवड्यात … Read more

कृपया झुंबड करू नका! राज्यात ६ महिने पुरेल इतका अन्नधान्य पुरवठा- छगन भुजबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशातील महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी बाजारात नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. त्यामुळं करोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन भाजी बाजार, किराणा दुकानात झुंबड करू नका असं आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जनतेला केलं … Read more

करोना अपडेट्स: महाराष्ट्रात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पार, तर देशात ५००

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात करोना व्हायरसचा संसर्ग जलद गतीने वाढत असून करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५०० पर्यंत पोहोचली आहे. महाराष्ट्रात करोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पर्यंत पोहोचली आहे. या आजाराने देशभरात ९ जणांचा बळी घेतला आहे. जगभरात तर या व्हायरसचामुळे आतापर्यंत १६ हजारपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. जगभरात साडेतीन लाखापेक्षा जास्त … Read more

काय बोलतील पंतप्रधान मोदी; आज रात्री ८ वाजता देशाला करणार संबोधित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते देशवासियांना मार्गदर्शन करणार आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिकांना जनता कर्फ्यूच आवाहन केलं होतं. देशभरात पंप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तसेच करोनाच्या संकटात आपले कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टर, नर्स, … Read more

करोनापासून स्वतःला वाचवायचंय, तर ‘या’ गोष्टी नक्कीच करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाविरुद्धची लढाई आता एका निर्णयक टप्प्यावर आली आहे. आणि या टप्प्यावर आपल्याला पूर्ण क्षमतेने या कोरोनाचा अधिक जोमाने मुकाबला करायचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातच राहण्याची गरज आहे. मात्र, घरी राहून सुद्धा तुम्हाला काही गोष्टींमध्ये अतिदक्षता पाळायची गरज आहे. जेणेकरून करोनापासून तुम्हाला तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा बचाव करता येईल. अशाच काही … Read more

काळजी नका करू! संचारबंदीत ‘या’ गोष्टी राहणार सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर पाऊल उचललं आहे. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्याचसोबत जिल्ह्याच्या सीमा सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केल्यानंतर … Read more

पुण्यातील PMPML बस सेवा बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनामुळे जमावबंदी जाहीर करण्यात आली असताना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पीएमपीएल सेवा केली बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज संध्याकाळी ५ वाजल्यानंतर पुण्यातील सार्वजनिक वाहतूक करणारी PMPML बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. राज्यात जमावबंदी लागू झाल्यानंतर पीएमपीएल बस सेवा सुरु होती. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पाठपुरावा करूनही … Read more

अन्यथा..राज्यात ‘कर्फ्यू’ लावावा लागेल- गृहमंत्री अनिल देशमुख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनामुळे जमावबंदी असून सुद्धा लोकांमध्ये त्याचे गांभीर्य दिसत नाही आहे. जनता कर्फ्यू उठताच अनेक लोकांनी जमाव बंदीच्या आदेशाला धाब्यावर बसवत आपल्या खासगी वाहनाने रस्त्यावर गर्दी केली आहे. मुंबई-पुण्यासह राज्याच्या अनेक भागात वाहतुकीची कोंडी होत असून त्यामुळे गर्दीही होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागरिकांना कडक इशारा दिला … Read more

राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद होणार; कठोर पाऊल उचलण्याचे सरकारचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे राज्यात जमाव बंदी लागू करण्यात आलेली असतानाही लोक ती गांभीर्याने घेत नाही आहेत. अनेक लोकांनी जमाव बंदीचा आदेश झुगारून खासगी वाहनांनी प्रवास सुरू केला आहे. त्यामुळं राज्य सरकार राज्यातील सर्व जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते. मुख्यमंत्र्यांची पोलीस प्रशासनासोबत बैठक सुरु असून परभणी जिल्ह्यात आधीच या संभावित निर्णयाची अंमलबजावणी … Read more