हुंडा घेऊन साखरपुडा ऐकीशी; लग्न मात्र लावले दुसरीशी, नवरदेवाच पुढे काय झालं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना । दोन लाख रुपयांचा हुंडा घेऊन साखरपुडा साखरपुडा केला असताना त्यांना धोका देत दुसऱ्याच मुलीशी लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार बदनापूर तालुक्यातील वाळकुळी येथे समोर आला आहे. डबलगेम खेळणं वरपक्षाला चांगलंच महागात पडले आहे .याप्रकरणी नवरदेवासह वरपक्षातील 7 जणांविरुद्ध बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथील बाबूलाल हरी जाधव यांची मुलगी नीता हिचा विवाह औरंगाबाद तालुक्यात विजय गोविंद राठोड या मुलांबरोबर रीतिरिवाजाप्रमाणे ठरला. नवरदेव-नवरी दोघांचा साखरपूडाही वधुपित्याने धूमधडाक्यात केला. यावेळी वरपक्षाने 2 लाख रुपयांची मागणी केली.तेव्हा नवरीचे वडील बाबूलाल जाधव यांनी मुलीच्या सुखासाठी 2 लाख रुपये दिले. यानंतर वर पक्षांकडील लोक साखरपुढा झाल्यानंतर लग्न करण्यासाठी टाळाटाळ करत होते. ठरवलेल्या तारखेला लग्नही झाले नाही. लग्नासाठी उडवा-उडवी करण्यात येऊ लागली.

त्यानंतर आपली फसवणूक केली जात असल्याची बाब नवरीच्या वडिलांना समजले.यानंतर वडील बाबूलाल जाधव यांनी थेट बदनापूर पोलीस ठाणे गाठले. आणि फसवणुकीची फिर्याद पोलीसांना दिली. वधू पक्षाची फसवणूक केल्याबद्दल नवरा मुलगा गोविंद राठोड याच्यासह दिलीप पवार, बबन पवार, नवऱ्या मुलाची बहीण सुनीता पवार (तिघे राहणार चितेपिंपळगाव, ता. औरंगाबाद), योगेश चव्हाण, श्रीचंद राठोड, वरपिता गोविंद रायसिंग राठोड अशा सात जणांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील या करत आहेत.

Leave a Comment