राज्यात तलाठ्यांची 4000 पदे भरण्यात येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. यानुसार प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 4 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी आज दिले. श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, सहसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी विखे-पाटील म्हणाले की, गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळातच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत लवकर कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार असून यामुळे भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल.

कोणत्या विभागात किती पदे

पुणे विभाग –

मंजूर पदे 2543
स्थायी पदे – 1620
अस्थायी पदे 923

नाशिक विभाग

मंजूर पदे – 2118
स्थायी पदे- 1364
अस्थायी पदे 754

कोकण विभाग

मंजूर पदे 1445
स्थायी पदे 1014
अस्थायी पदे – 431

अमरावती विभाग

मंजूर पदे – 2326
स्थायी पदे – 1806
अस्थायी पदे- 520

औरंगाबाद विभाग

मंजूर पदे – 2533
स्थायी पदे- 1523
अस्थायी पदे – 1010

नागपूर विभाग

मंजूर पदे 1671
स्थायी पदे – 1247
अस्थायी पदे- 424

अधिक महितीसाठी जाहिरात पहा PDF