BSNL साठी सरकारने केला TATA सोबत करार; 4G नेटवर्कला येणार गती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जुलै महिन्यामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्यांनी त्याच्या रिचार्जच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे अनेक ग्राहक हे बीएसएनएल या कंपनीकडे मिळालेले आहेत. बीएसएनएल (BSNL) ही एक सरकारी कंपनी आहे. आणि या सरकारी कंपनीचे जाळे सर्वत्र पसरवण्यासाठी सरकार देखील विविध प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार आता बीएसएनएलसाठी (BSNL) वेगळ्या गुंतवणुकीचे अनेक मार्ग शोधत आहेत. तसेच त्यांनी यासाठी 6 हजार कोटींचा अतिरिक्त निधी आणण्याची देखील योजना केलेली आहे. सध्या इतर सगळ्या कंपन्यांनी 4G नेटवर्क लॉन्च केलेले आहेत. परंतु बीएसएनएलने अजूनही 4G नेटवर्क लॉन्च केलेले नाही. आणि याच कारणामुळे त्यांचे अनेक ग्राहक कमी देखील होत आहे. आता त्यांच्या ग्राहकांची कमी होणारी संख्या पाहता सरकारने गुंतवणूक करण्याचा एक मोठा निर्णय घेतलेला.

लोकल स्टॅकचा वापर केला आहे. त्यामुळे या निधीच्या मदतीने 4G नेटवर्क आता लवकर सुरू होण्यास देखील मदत होणार आहे. दूरसंचार विभाग आता ही फाईल कॅबिनेटकडे मंजुरीसाठी पाठवणार आहे. मागील वर्षी बीएसएनएलला या 4G नेटवर्कसाठी 19000 कोटी मोजावी लागले होते. यासह 1 लाख 4 जी साईटचे काम पूर्ण झाले आहे. अशातच आता टीसीएस म्हणजे टाटा कन्सल्टन्सी (TATA) सर्विसेस आणि आयटीआय कडून बीएसएनएलसाठी अनेक उपकरणे देखील तयार केली जात आहेत. आणि यासाठी या दोन्ही कंपन्यांना सरकारकडून 13000 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. अजूनही सरकारकडे या कंपन्यांचे सहा हजार कोटी रुपये थकबाकी आहे. सरकारने आतापर्यंत bsnl साठी 3.22 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. परंतु आता यातून नक्की काय फायदा होणार आहे? हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे.

मागील वर्षी BSNL कंपनीने आयटी कंपनी टीसीएस आणि सरकार दूरसंच संशोधन संस्था सीडी चे नेतृत्वाखाली पंजाबमध्ये फोरजी सेवा सुरू केली आणि याद्वारे आठ लाख ग्राहक जोडले गेले होते. त्यानंतर बीएसएनएलचे नेटवर्क संपूर्ण पंजाबमध्ये सुरळीत चालू झालेले आहे. अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले आहे. बीएसएनएल लवकरच त्यांचे 4 जी आणि 5 जी सेवा त्यांच्या ग्राहकासाठी लवकरच लॉन्च करणार आहे. त्यामुळे बीएसएनएलच्या (BSNL) सेवेत देखील सुधारणा होणार आहे. आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी देखील पूर्वीपेक्षा चांगली असते, असे सांगितले जात आहे.