अमरनाथ यात्रेवर दहशतीचे सावट, दहशतवादी संघटनेची केंद्र सरकारला धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील महत्वाच्या अशा व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेला पुढील महिन्यातील 30 जूनपासून सुरुवात होणार आहे. मात्र, या यात्रेवर दहशतवादाचे सावट असून दहशतवादी संघटना TRF ने पत्राद्वारे धमकी दिली आहे. या पत्रातून TRF ने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला इशाराही दिला आहे.

अमरनाथ यात्रे संदर्भात देण्यात आलेल्या धमकीच्या पत्रात दहशतवादी संघटना ‘द रेजिस्टेंस फ्रंटने म्हटले की, आम्हाला अमरनाथ यात्रामध्ये कोणताही अडथळा आणायचा नाही अथवा अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने काश्मीरमध्ये येणाऱ्या भाविकांच्याही विरोधात नाही. मात्र, या यात्रेचा वापर हा केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या घाणेरड्या राजकारणासाठी करणार असल्याचे आमच्या लक्षात आले आहे. अमरनाथ यात्रेसाठी 15,000 ते 8 लाख यात्रेकरूंची नोंदणी ही 15 दिवसांपासून ते 80 दिवसांपर्यंत करण्यात येत आहे. याद्वारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या स्वयंसेवकांना काश्मीरमधील परिस्थिती चिघळवण्यासाठी पाठवत असल्याचा दावा संघटनेने केला आहे.

राजकीय फायद्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू असून त्याच्या या प्रयत्नाला आमचा विरोध असणार असल्याचे टीआरएफने म्हटले. अमरनाथ यात्रेसाठी येणारे भाविक सुरक्षित राहतील. मात्र, त्यांनी संघाच्या स्वयंसेवकांना मदत, आश्रय देऊ नये. अन्यथा गंभीर परिणाम होतील, अशीही धमकी दहशतवाद्यांनी दिली आहे. यंदाच्या वर्षी अमरनाथ यात्रा 30 जूनपासून पहलगाम आणि बालटाल या दोन मार्गांपासून सुरू होणार आहे.

Leave a Comment