बेवारस वाहनांवर कारवाईचा धडाका; दुसऱ्याही दिवशी सुरुच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली भंगार वाहनांमूळे वाहतूक कोंडी आणि वाहन चालवण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामूळे या वाहनावर 2 ऑगस्ट पासून कारवाईचे आदेश प्रशासकांकडून देण्यात आले होते. या आदेशाची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात आली. प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार झोन 1 पासून सुरुवात करण्यात आली असून सोमवारी या भागातील सहा वाहने जप्त करण्यात आली होती.

काल झोन क्रं 2 अंतर्गत शहागंज, लक्ष्मण चावडी, पानदरीबा रोड, सारस्वत बँक समोर खडकेश्र्वर, कोतवालपुरा खडकेश्र्वर या भागातील मनपाच्या पथकाने आठ वाहनांवर कारवाई केली. या भंगार बिनकामी वाहनांवर सात दिवसांची नोटीस लावण्यात येईल आणि सात दिवसानंतर वाहने उचलली नाही तर महानगर पालिकेकडून वाहने जप्त केली जाणार असल्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले होते. यापैकी एका वाहन मालकांने कारवाई टाळण्यासाठी सात हजार रुपये दंड जमा केला.

आस्तिक कुमार पांडे यांनी या वाहनांचा तपशील आरटीओकडे पाठवण्याची सूचना दिली आणि वाहन नोंदणीची कागदपत्रे आणि त्याच्या मालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची शिफारस केली होती. आज कारवाईच्या पहिल्याच दिवशी महापालिका, पोलीस आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी या मोहिमेला हाथभार लावला. महापालिकेने अतिक्रमणविरोधी पथक, यांत्रिक विभाग, पोलिस सुरक्षा आणि नागरिक मित्र पथक यांच्या कर्मचाऱ्यांसह ही मोहीम फतेह केली आणि मोहिमेच्या पहिल्याच दिवशी सहा वाहने उचलली असल्याचे कार्यवाहक प्रभाग अधिकारी संजय सुरडकर यांनी सांगितले. महापालिका यांत्रिकी विभाग, अतिक्रमण हटाव विभाग, पोलीस, आरटीओ यांच्यावतीने ही कारवाई आजपासून करण्यात येणार आहे.

Leave a Comment