सरकारी कर्मचाऱ्यांना सरकार होळीपूर्वी देणार 10 हजार रुपयांची भेट; त्यासाठी काय करावे लागेल समजून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना स्पेशल फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स स्कीम देण्याची घोषणा करू शकते. या योजनेत केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स देते, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना सुमारे 10 हजार रुपये मिळू शकतात. केंद्रीय कर्मचाऱ्यांना या रकमेवर कोणतेही व्याजही द्यावे लागत नाही. मात्र, दरमहा तुमच्या पगारातून सॅलरीची अ‍ॅडव्हान्स रक्कम कापली जाते. गेल्या वर्षीही सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही घोषणा केली होती.

10 हप्त्यांमध्ये रुपये परत करायचे आहेत
या योजनेअंतर्गत केंद्रीय कर्मचार्‍यांना ही रक्कम 10 हप्त्यांमध्ये परत करण्याची सुविधा मिळू शकेल. म्हणजेच व्याजाशिवाय तुम्ही आरामात पैसे परत करू शकता. हे फक्त 1,000 रुपयांच्या मासिक हप्त्यांमध्ये भरता येते.

डिजिटल पद्धतीनेच खर्च करता येतील पैसे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स स्कीम अंतर्गत सुमारे 4000-5000 कोटी रुपयांच्या वाटपाची घोषणा केली जाऊ शकते. राज्य सरकारनेही ही योजना अंमलात आणली तर सुमारे 8,000-10,000 कोटी रुपये खर्च होतील. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, सरकार अ‍ॅडव्हान्स स्कीमसाठी बँक शुल्क देखील घेईल. कर्मचारी देखील ही आगाऊ रक्कम डिजिटल पद्धतीने खर्च करू शकतील.

LTA ला दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली
यापूर्वी, सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा Leave Travel Allowance (LTA) दोन वर्षांसाठी वाढवला होता. यासह केंद्रीय कर्मचारी मार्च 2022 पर्यंत ईशान्य, लडाख, अंदमान-निकोबार आणि जम्मू-काश्मीरच्या प्रवासासाठी Leave Travel Allowance (LTA) वापरू शकतील.

Leave a Comment