‘त्या’ स्त्री-पुरुषाचा होरपळूनच झाला मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – गांधीली शिवारातील उभ्या कारमध्ये स्त्री-पुरुषाचा मृत्यू होरपळूनच झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. पण या दोघांचे काय संबंध होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

16 फेब्रुवारी रोजी कारमधील एसीच्या स्फोटात रोहिदास गंगाधर आहेर, शालिनी सुखदेव वानखेडे यांचा मृत्यू झाला होता. रोहिदास हे बांधकाम व्यावसायिकाकडे चालक होते. शालिनी या धुणीभांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होत्या. रोहिदास यांच्या पश्चात पत्नी तीन मुली असा परिवार आहे. त्यापैकी दोन मुली विवाहित आहेत. शालिनी यांना दोन मुली, दोन मुले आहेत. दोन्ही मुलींचे विवाह झालेले आहेत. विशेष म्हणजे त्यांचे कुटुंबीय एकमेकांना ओळखत नाही.

एसीच्या स्फोटाची कारणे शोधण्यासाठी न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, आरटीओ व संबंधित कंपनीला पत्र देवून तांत्रिक तपासणी करण्यात येत आहे. मृतांचे चेहरे, हातपाय होरपळले आहेत. मात्र गाडीचा थोडा भागत जळाला. मागचे सीट सुरक्षित आहे त्यामुळे दोघांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे.

Leave a Comment