देशात या राज्यांत पुढच्या २४ तासांत येणार वादळ; हवामान खात्याचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या संकटाशी झुंज देत आहे, तर दुसरीकडे देशातील अनेक राज्यांत अवकाळी पाऊस आणि धूळीचे वादळही सुरु आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले की, येत्या २४ तासांत जयपूर, दौसा, नागौर, अजमेर, श्रीमाधोपूर, अलवर, भरतपूर, करौली आणि धौलपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ३५ किमी / तास वेगाने या वादळाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच त्यांनी सतर्कतेचा इशारा देखील जारी केला आहे.

हवामान विभाग
धुळीच्या वादळाचा इशारा
जयपूर, दौसा, नागौर, अजमेर, सवाई माधोपूर, अलवर, भरतपूर, करौली आणि धौलपूर जिल्ह्यांतही हवामान विभागाने धुळीच्या वादळाचा इशारा दिला असून लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. सोमवारी दिल्ली-एनसीआरमध्ये वादळ व जोरदार वाऱ्या सह देशातील अनेक राज्यांत काही ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे पिकांचेही नुकसान झाले आहे, पुढील तीन दिवस हवामान खात्याने देशातील अनेक राज्यांमध्ये अशाच प्रकारचे वातावरण राहण्याची भीती व्यक्त केली आहे.

आयएमडी
दिल्लीतील हवामान आज कोरडे राहील
आयएमडीच्या म्हणण्यानुसार दिल्लीत आज हवामान कोरडे राहील परंतु देशातील अनेक राज्यांत मात्र येत्या चोवीस तासांत हवामानाची परिस्थिती खराब होण्याची शक्‍यता आहे. असे म्हटले जाते की देशात बर्‍याच ठिकाणी गारपीटीसह पाऊस व वादळाची शक्यता आहे आणि यावेळी वारा देखील ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वाहू शकतो.

 

राजस्थान आणि गुजरातमध्ये वादळ येऊ शकते
अलर्ट जारी केला
आयएमडीने हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय सब-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, उत्तर ओडिशा, अंदमान आणि निकोबार, जम्मू काश्मीर, लडाख, राजस्थान, किनारी आंध्र प्रदेश, अंतर्गत तमिळनाडू येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे, तर राजस्थान तसेच गुजरातमधील लोकांना वादळाचा सामना करावा लागू शकतो. आहे, तर लोकांना अधिक सतर्क राहण्यास सांगितले गेले आहे.

‘डस्ट स्टोर्म’ ही हवामानासंबंधी आपत्ती आहे
‘डस्ट स्टोर्म’ म्हणजे काय ?
‘डस्ट स्टोर्म’ कोरड्या हवामान आणि अर्ध-रखरखीत प्रदेशात होणारी हवामान आपत्ती आहे ज्यात कोरड्या पृष्ठभागावरुन जोरदार वारा सुटल्याने वाळू आणि घाण वाहते तेव्हा धुळीची वादळे उद्भवतात, ही प्रक्रियेत मातीला एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नैसर्गिकरित्या नेले जाते. शहरी भागात ‘डस्ट स्टोर्म’ हा शब्द वापरला जातो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment