दहा हजाराची लाच घेताना दोघेजण एसीबी पथकाच्या जाळ्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | जालन्यातील कर्मचाऱ्यांची औरंगाबादला बदली करण्यासाठी दहा हजारांची लाचेची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी एसीबीच्या पथकाने पाटबंधारे मंडळाच्या सहाय्यक अधीक्षक अभियंता व वरिष्ठ लिपिकावर शनिवारी कारवाई करण्यात आली.

औरंगाबाद येथील रहिवासी असलेले सहाय्यक अधीक्षक अभियंता संजीवनी गर्जे (वय 57) आणि वरिष्ठ लिपिक मनसुब रामराव बावस्कर (वय 57) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे आणि लिपिकाचे नाव आहे. हाती आलेल्या माहितीनुसार काही दिवसापूर्वी जालना जिल्ह्यातील पाटबंधारे मंडळात कार्यरत असलेले कर्मचारी यांनी विनंती करून औरंगाबाद बदली करून द्यावी अशी मागणी केली होती.

परंतु बदली करण्यासाठी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. यानंतर तक्रारदाराने एसीबीच्या कार्यालयात धाव घेत एसीबीच्या पथकाने या प्रकरणी तपासणी करत सापळा रचला. अखेर वरिष्ठ लिपिक मनसुब बावस्कर यांना अटक करण्यात आली.

Leave a Comment