“मतदार काँग्रेस आघाडीच्या बाजूनेच होते… मात्र, आम्हीच कमी पडलो” – सत्यजित तांबे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । “मतदार काँग्रेस आघाडीच्या बाजूनेच होते. मात्र, आम्हीच कमी पडलो” अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सध्याचे विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यावर व्यक्त केली. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहिर होत असतांना अनेक ठिकाणी कॉंग्रेस पक्षांने अपेक्षित यश मिळवलेले दिसत आहे.

काँग्रेस आघाडीमध्ये सोबत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने चांगलीच मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ह्या निवडणुकीमध्ये स्वतः संपूर्ण राज्यभर फिरून प्रचार केला होता. त्यामुळे त्यांच्या प्रचाराचा फायदा हा पक्षाला आज अनेक ठिकाणी विजयी उमेदवारांच्या रुपात बघायला मिळत आहे.

तर दूसरीकडे काँग्रेस कडून अशा स्वरूपाचा प्रचार करतांना कोणी दिसून आले नसले तरी कॉंग्रेस पक्षाला आजच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळतांना दिसत आहे. त्यामुळे जर पक्षांने सहकारी पक्षांप्रमाणे जर जोरात प्रचार केला असता, तर निश्चितपणे आज पक्षाच्या विजयी उमेदवारांची आकडेवारी ही वाढली असती.

त्यामुळे आजच्या ह्या निकालावर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी स्वतः पक्ष व नेते याबाबत कमी पडले हे ह्या प्रतिक्रियेतून स्वीकारलेले दिसत आहे.


Leave a Comment