ट्रक-बस मध्ये भीषण अपघात ; 13 जणांचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । ट्रक आणि बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात १३ जण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं समजलं आहे. आज पहाटे चार वाजताच्या सुमारास आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील मदारपूर गावाजवळ ही घटना घडली. या घटनेत चौघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की मिनी बस चित्तूर जिल्ह्याकडून हैदराबादच्या दिशेने जात होता. बसमधील सर्वजण राजस्थानातील अजमेरला जात होते होते. दरम्यान, पहाटे चार वाजताच्या सुमारास कर्नूल जिल्ह्यातील वेलदूर्ती हद्दीत असलेल्या मदरापूर गावाजवळ बसने विरुद्ध दिशेकडून येत असलेल्या ट्रकला धडक दिली. आणि हा भीषण अपघात घडला.

प्राथमिक अंदाजानुसार चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानंतर बस समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. बस आधी डिव्हायडरला जाऊन धडकली. डिव्हायडर तोडून बसने ट्रकवर जाऊन आदळली. बस आणि ट्रकचा वेग प्रचंड असल्यानं या भयंकर अपघातात १३ जण ठार झाले, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment