जिंतुर मध्ये तलावात बुडुन दोन मुलांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

तलावात पोहायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दि २४ एप्रिल रोजी जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी येथे घडली. यामुळे कुऱ्हाडी गावावर शोककळा पसरली असून मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले आहेत.

कुऱ्हाडी गावात असणाऱ्या तलावात पोहण्यासाठी
करण सुभाष निकाळजे वय १० वर्षे व पवन दिलीप आडे १० वर्षे हे दोघे गेले होते. दोघांनाही पोहता येत नसल्याने व पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यु झाला आहे.

दरम्यान ग्रामस्थांनी दोघांना तलावातून बाहेर काढून जिंतूरच्या शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यातील पवन आडे हा मंठा येथील राहणार असून सुट्ंयाकरता आजोबा कडे रहायला आला होता. गावातील दोघा चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समजल्यावर परिसरात शोककळा पसरलीय.

Leave a Comment