गोदावरीच्या पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू ; परभणीतील दुर्देवी घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे |

परभणी जिल्ह्यातील गोदावरी पात्रात मध्ये आज झालेल्या एका दुर्दैवी घटनेमध्ये हे दोघा बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे . पाथरी तालुक्यातील मरडसगाव येथे ही दुर्घटना घडली आहे .

मर्डसगाव येथील दोन बालके सकाळी अकराच्या सुमारास गोदावरी पात्रातील पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी कृषी पंपाच्या पाणी उपसण्यासाठी खोदण्यात आलेल्या नदीपात्रातील खड्ड्यातील पाण्यामध्ये दोघा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.मृतांमध्ये  आशिष भिकू साळवे वय 12 आणि मेहुल सुधाकर लोखंडे वय 8 या दोन मुलांचा समावेश आहे.

खड्ड्यात पडत असताना नदीपात्रात खेळत असणाऱ्या इतर मुलांनी त्यांना पाहिले होते .यावेळी खूप वेळ झाला तरी डोहात पडलेले दोघे वर येत नसल्याने घाबरून जात उपस्थित मुलांनी गावकऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. सदर ठिकाणी गावकरी पोहोचेपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. मयत आशिष हा सातव्या वर्गात शिकत होता तर मेहुल हा चौथ्या वर्गात शिकत होता . या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment