ऑनलाईन परीक्षा संदर्भात उदय सामंत यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती; म्हणाले की,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राज्यातील महाविद्यालयातील ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षांसंदर्भात आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाची माहिती दिली. “कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये प्रत्यक्ष प्रवेश दिला जाणार आहे. ऑनलाईन परीक्षा या नाईलाजाने आपण घेत आहोत. कोरोनामुळे आपण ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केले. मात्र, आता विध्यार्थी उद्यापासून महाविद्यालयात येण्यास सुरुवात होणार असल्याने आपण ऑफलाईन परीक्षाच घेणार आहोत,ऑनलाईन परिक्षा नाईलाजाने घेतोय. त्या घ्याव्यात असा आग्रह नाही. या परिक्षा तात्पुरत्या स्वरुपाच्या आहेत. विद्यार्थी वर्गात यायला सुरुवात होतील त्यावेळी ऑफलाईनच परिक्षा घेतल्या जातील,” असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

ऑनलाईन परिक्षा नाईलाजाने घेतोय - सामंत

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “राज्यात कोरोना परिस्थितीमुळे लोकांचे आरोग्य ढिवक्यात येत आहे. कोरोनाला घालवायचे असेल तर नियमित मास्क वापरणे गरजेचे आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी कोरोनाचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी तेथील प्रशासन आणि महाविद्यालय प्रचारीवर्गाशी चर्चा केल्यानंतर त्या त्या विध्यार्थ्यांच्या आरोग्यासंदर्भात दक्षता घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.”

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/626442091904303

महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात विद्यापीठांचे कुलगुरु, शिक्षण विभागाच्या अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन तसेच ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यास विध्यार्थ्यांच्या लसीकरणासंदर्भात चर्चा करण्यात आली.

तसेच सातारा जिल्ह्यातील इंजिनियरिंग, फार्मसी तसेच पॉलिटेक्निक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे दोन्ही डोसचे लसीकरण किती प्रमाणात करण्यात आलेले आहे. तसेच इतर खासगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात यावे याबाबात अशा सूचना जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून दिलेल्या आहेत. राज्यातील महाविद्यालयातीळ वर्ग हे उद्या दि. 1 फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष म्हणजेच ऑफलाइन सुरू होणार आहेत. महाविद्यालयात प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये प्रत्यक्ष प्रवेश दिला जाणार आहे.

Leave a Comment