हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल बँकेत जाण्यापेक्षा मोबाईल मधूनच UPI द्वारे अनेकजण पेमेंट (UPI Payments) करत असतात. एकेमकांना पैसे पाठवण्यासाठी हा सर्वात सोप्पा आणि कमी वेळेचा पर्याय मानला जातो.. सध्या UPI च्या माध्यमातून कोणाला पैसे पाठवायचे असतील तर कमीत कमी ३० सेकंद वेळ लागतो. मात्र आता हीच वेळ अवघ्या १५ सेकंदावर येणार आहे. म्हणजेच काय तर तुम्ही फक्त १५ सेकंदात एकमेकांना पैसे पाठवू शकता. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने याबाबत आदेश दिला असून ही प्रक्रिया १६ जूनपासून सुरू होणार आहे.
आतापर्यंत, UPI अॅप वापरून पैसे पाठवण्यासाठी (UPI Payments) , लोकांना QR कोड स्कॅन करावा लागत होता आणि व्यवहाराची पुष्टी होण्याची वाट पहावी लागत होती, ज्यामध्ये कधीकधी बराच वेळ लागतो. NPCI ने हा वेळ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत एपीआई रेस्पॉन्स टाइमची भूमिका महत्वाची असणार आहे. API म्हणजे अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. हे नियमांचा एक संच आहे ज्यानुसार सॉफ्टवेअर एकमेकांशी जोडले जातात. हे UPI पेमेंट सिस्टममध्ये वापरले जाते.
नवीन बदलांमुळे लोकांचा अनुभव आणखी चांगला होईल- UPI Payments
यापूर्वी १२ एप्रिल रोजी काही टेक्निकली अडचणींमुळे UPI वापरकर्त्यांना व्यवहारांमध्ये अडचणी आल्या. NPCI ने तेव्हा कबूल केले होते की सिस्टममध्ये काही बिघाड झाला होता, जो लगेचच दुरुस्त करण्यात आला. आता नवीन बदल लागू झाल्यानंतर, डिजिटल पेमेंट आणखी जलद, सोपे आणि विश्वासार्ह होईल अशी अपेक्षा आहे. नवीन बदलांमुळे लोकांचा अनुभव आणखी चांगला होईल असा विश्वास NPCI ला आहे. NPCI ने फोनपे आणि पेटीएम सारख्या मोठ्या कंपन्यांनाही नवीन नियमांनुसार त्यांच्या सिस्टम अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत एनपीसीआयच्या परिपत्रकात म्हटले आहे की या नव्या बदलांचा उद्देश एकूण यूजर्सचा अनुभव सुधारणे हाच आहे. लोकांना लवकर पेमेंट करता यावे आणि पैसे लवकर मिळावेत असच NPCI ला वाटत…