वैभव गोसावींचा स्वामी समर्थांचे वंशज असल्याचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर । अक्कलकोट येथील श्री श्री स्वामी समर्थ महाराज हे सबंध महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांची भक्ती करणारे महाराष्ट्रासह सह शेजारील राज्यातील भाविक आहेत. अशातच वैभव गोसावी त्यांनी स्वामी समर्थांचे आपण सातवी वंशज असल्याचा दावा केला आहे.

या दाव्यात त्यांनी समर्थांचा मी मी थेट सातवा वंशज असून मला त्याची कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी न्यायालयात गेले आहेत. त्यांनी सोलापूर येथील दिवानी न्यायालयात वकिलामार्फत दावा दाखल केला आहे. दाव्यामध्ये त्यांनी पुरावे म्हणून अनेक मोडी लिपीतील ऐतिहासिक पत्रे वंशावळ जमिनीचे कागद दिले आहेत. तसेच न्यायालयासाठी लागणारे इतर सक्षम पुरावे जोडले आहेत. हा दावा प्रलंबित असून कोर्टामध्ये आहे त्यावर कामकाज सुरू आहे.

रतन गोसावी यांनी दाव्यात काही लोकांवर महाराजांच्या नावाने अंधश्रद्धा पसरविणे, तसेच मूर्तीला साडीचोळी घालने, लोकांची आर्थिक फसवणूक करणे, प्रसार माध्यमातून महाराजांची माहीत नसलेली माहिती समाजासमोर प्रसारित करने असे आरोप केले आहेत. त्यामुळे महाराजांची प्रतिमा मलीन होत असून आपण पण यावर कारवाही करणार असल्याची टिप्पणीही जोडली आहे. महाराजांचे खरे सत्य लोकांसमोर यावे हाच आपला प्रयत्न असल्यचे त्यांचे म्हणणे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment