Vegetable Price | सातत्याने का वाढत आहेत भाज्यांचे भाव? हे मोठे कारण आले समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vegetable Price | भारतीय नागरिकांच्या जेवनामध्ये पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. यामध्ये चांगले पोषणतत्व देखील असतात. परंतु आजकाल भाज्यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे याचा परिणाम हा सर्वसामान्य माणसांवर होत आहे. गेल्या एक ते दोन आठवड्यात भाज्यांचे भाव (Vegetable Price) हे दुपटीने वाढलेले आहेत. त्यामुळे सामान्य माणसांना आता भाजी खाणे देखील परवडत नाही.

पिकाचे नुकसान | Vegetable Price

यावर्षी तापमान वाढ खूप जास्त होती. आणि पावसालाही मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. त्यामुळे भाजीपाला बाजारामध्ये नीट पोहोचत नसल्याने त्याची आवक देखील कमी झालेली आहे. त्याचप्रमाणे अत्यंत कडक उन्हानंतर आता पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे भाजीपाला लवकर खराब होत आहे. सध्या कांदे, बटाटे, टोमॅटो यांसारख्या भाज्यांच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे.

मान्सूनच्या पावसात घट

उन्हाळ्यात भाज्यांचा तुटवडा भासणे ही बाब सर्रास असली तरी यंदा टंचाई तीव्र झाली आहे. याचे कारण म्हणजे संपूर्ण देशात सामान्य तापमान ४ ते ९ अंश सेल्सिअस राहिले आहे. एवढेच नाही तर या वेळी मान्सूनचा पाऊसही उशिराने येत असल्याने पिके वाढवण्यात अडचणी येत आहेत. या हंगामातील पावसात १८ टक्के तूट आहे.

भाज्यांचे दर कमी होऊ शकतात

मिळालेल्या माहितीनुसार रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, उष्मा आणि कमी पाऊस यामुळे भाजीपाला आणि फळांच्या पिकांवर परिणाम झाला आहे. तज्ज्ञांच्या मते जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यास ही समस्या कमी होऊ शकते. त्यामुळे भाज्यांचे दरही कमी होऊ शकतात

दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाज्यांचे भाव वाढले | Vegetable Price

टोमॅटोच्या दरात सर्वाधिक वाढ दक्षिणेकडील राज्यांमध्ये झाली आहे. कडक उन्हामुळे आणि मान्सूनचे उशिरा आगमन यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले असून, कडक उन्हामुळे भाजीपाला खराब होऊ लागला असून, त्यामुळे त्यांच्या भावात वाढ होत असल्याने हा प्रकार घडत आहे. मात्र येत्या आठवडाभरात चांगला पाऊस झाल्यास भाजीपाल्याचे दर कमी होण्याची आशा आहे.