‘तुबची-बबलेश्वर’चे पाणी देणारच अन्यथा जतमध्ये पाऊल देखील ठेवणार – विश्वजीत कदम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । काँग्रेस  ही संकल्पना काँग्रेस उमेदवार विक्रम सावंत यांची असून या योजनेमुळे जतला पाणी मिळणार आहे. जतकरांना जर का हे पाणी मिळाले नाही तर मी जतमध्ये पाऊल देखील ठेवणार नसल्याचा निर्वाळा पलूस-कडेगाव मतदारसंघाचे आमदार विश्वजीत कदम यांनी केला. येत्या जानेवारीत आम्ही दोन कारखान्यांचे काम सुरू करणार असल्याचे हे त्यांनी यावेळी सांगितले. ते काँग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रचारार्थ बनाळी, शेगाव व कुंभारी येथील जाहीर सभेत बोलत होते.

यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले, विद्यमान लोकप्रतिनिधींच्या हुकूमशाही वृत्तीला जनता कंटाळली असून गटा-तटाच्या राजकारणाला ही ते वैतागले आहेत. जनतेने यावेळी मतदारसंघात परिवर्तन करून काँग्रेस -राष्ट्रवादी महाआघाडीचे  उमेदवार विक्रमसिंह सावंत यांनाच विजयी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

यावेळी उमाजीराव सनमडीकर, आप्पाराया बिराजदार, महादेव पाटील, बाबासाहेब कोडग, अशोक बन्नेनवर, संतोष पाटील, नाना शिंदे, पिराप्पा माळी, महादेव अंकलगी यांच्यासह अनेक मान्यवर सभेत उपस्थित होते.

Leave a Comment