‘स्वतःची लायकी काय आहे हे स्वतःला कळलं पाहिजे’ ;जितेंद्र आव्हाड यांचा पंतप्रधान मोदींना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई
”स्वतःची लायकी काय आहे हे स्वतःला कळलं पाहिजे.” अशा शब्दात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. पंतप्रधान मोदींवर लिहलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.ते अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथे बोलत होते.

दरम्यान भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिलेलं ‘आज के शिवाजी-नरेन्द्र मोदी’ या पुस्तकाचं प्रकाशित करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आल्याने विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. यात राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत ”माझी लायकी काय आहे हे स्वतःला कळलं पाहिजे मोदींनी यावर स्वतः नकारात्मक प्रतिक्रिया दिली पाहिजे. हा शिवाजी महाराजांच्या मातीचा अपमान आहे. अस वक्तव्य अमरावतीतील चांदुर रेल्वे येथे केलं. NRC, CAA विरोधातील लोकजागर कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना केलं.

Leave a Comment