पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये ३५% जलसाठा; मागील वर्षीच्या तुलनेत २०% वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई

अमरावती विभागातील ५ जिल्ह्यामध्ये असलेले मोठे, मध्यम व लघु प्रकल्पात मागील वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या ५०९ पाणी प्रकल्पात केवळ १४.१५% फक्त जलसाठा हा शिल्लक होता. दरम्यान मागील वर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने या वर्षी या प्रकल्पात मे महिन्यात ३५% जलसाठा शिल्लक असल्याने अमरावती विभागात पाणी टंचाई ची फार चणचण जाणवणार नाही.

अमरावती विभागात सर्वात मोठे जलसाठा प्रकल्प असलेल्या अमरावतीच्या अप्पर वर्धा धरनात मागील वर्षी १६.४३% असलेला जलसाठा यावर्षी मात्र ५१.१८% असल्याने अमरावती सह इतर भागातही पाणी कापतिची परिस्थिती ओढवली नाही. २०१८ मध्ये समाधानकारक पावसाळा झाला नसल्याने मागील वर्षी अमरावती विभागातील अनेक धरणाना कोरड लागण्याच्या मार्गावर असल्याने पाणी टंचाई चा भीषण प्रश्न निर्माण झाला होता.जनावरांनसाठी ,वन्यजीव व शेतीसाठी पाणी नसल्याने बळीराजा  काळजीत सापडला होता.परंतु मागील वर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने विभागातील सर्वच प्रकल्पात जलसाठा हा मोठया प्रमाणावर साठवल्या गेला.

त्यामुळे या वर्षी पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागले नाही.अमरावती विभागातील एकूण पाच जिल्ह्यातील मोठे ,मध्यम व लघु असे एकूण ५०९ पाणी प्रकल्प आहे.यामध्ये ९ मोठ्या प्रकल्पात सध्या 42.96% टक्के जलसाठा आहे..अमरावती शहरासह अनेक भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणाने मागील वर्षी तळ गाठला होता.मे महिन्यात या प्रकल्पात १६.४३% इतका जलसाठा होता.परन्तु या वर्षी सध्याप्रकल्पात५१.१८% जलसाठा आहे.मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी हा जलसाठा सर्वाधीक आहे..

Leave a Comment