मोदींनी महाराष्ट्राचं कौतुक केलं,मग योग्य कोण? तुम्ही की पंतप्रधान? – जयंत पाटलांचा फडणवीसांना सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताळणीबाबत राज्य सरकारचे कौतुक केलं आहे. त्याच वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सरकारवर कायम टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत कोरोना मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे.

जयंत पाटील यांनी यासंदर्भात ट्विट करत म्हंटल की, देवेंद्र फडणवीसजी आजच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारने कोविडचा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल. आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, मा. पंतप्रधान कि तुम्ही?, असा खोचक सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस –

मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे. त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे. हे प्रकार तत्काळ थांबवण्यात यावेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment