हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अश्विन शुद्ध दशमीचा दिवस म्हणजे विजयादशमी- दसरा होय. हिंदू धर्मामध्ये दसऱ्याच्या सणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. नवरात्रीच्या दहाव्या दिवशी विजयादशमी- दसरा एकत्र साजरी केला जातो. या दिवशी देवी देवतांची आणि शस्त्रांची पूजा करण्यात येते. त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी आपट्याची म्हणजेच सोन्याची पाने वाटली जातात. लहान मुले आपल्या कुटुंबातील सदस्यांना आवर्जून ही पाने वाटतात. तसेच त्यांचा आशीर्वाद घेतात. हि परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. आपट्याची पाने वाटण्यामागे एक पौराणिक कथा देखील आहे.. या कथेतून आपल्याला आपट्यांच्या पानांचे महत्त्व समजते. चला तर मग जाणून येऊयात आपट्याच्या पानाचे महत्त्व आणि ती पाने वाटण्यामागे प्रमूख कारण.
पौराणिक कथा…
पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली सर्व शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती. त्यातील धनुष्य आणि बाण बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गाई सोडवण्यासाठी वापरले होते. यानंतर पुन्हा त्याने धनुष्य आणि बाण झाडावर ठेवून दिले. असे म्हणतात की, शमीच्या खोडातून व पानांतून उत्पन्न होणार्या तेजतत्त्वरूपी धगीमुळे पांडवांनी शस्रे आहे तशी राहिली होती. त्यावेळी सर्वांना शमीच्या झाडाचे महत्त्व समजले.
आपट्याच्या पानाचे महत्त्व..
दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने वाटली जातात. असे म्हणतात की, आपट्याची पाने ही एक नवी ऊर्जा तयार करते.
शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. तसेच, आपट्याची पाने ही आप व तेज या कणांशी जोडलेली असतात. शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्त्वाच्या बळावर प्रवाही बनतात. ज्यावेळी आपण आपट्यांच्या पानांचे आदान प्रदान करतो तेव्हा, हे तेजतत्त्वरूपी कण आपट्याच्या पानातून जिवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. ज्यामुळे जिवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होतात. तसेच, आवश्यक तत्त्व जिवाच्या सूक्ष्मदेहापर्यंत आपकणांच्या साहाय्याने झिरपले जातात. ज्यामुळे आपट्याची पाने वाटली जतात.
त्याचबरोबर, हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, शमीच्या झाडामध्ये कुबेर देव वास करतात. ज्यामुळे शमीच्या झाडाची पूजा केल्यावर घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. शमीच्या झाडांची पाने म्हणेजच आपट्याची पाने होय. ही पाने घरात ठेवल्यानंतर त्याची पूजा केल्यानंतर कुबेर देवतेची कृपा आपल्यावर कायम राहते. असे मानतात.. अशा अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने वाटली जातात.