पाणी भरताना टँकरखाली चिरडून महिलेचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद | पाणी भरताना अचानक टँकर मागे आल्याने त्या खाली चिरडून जखमी झालेल्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शहरातील झलटा फाटा परिसरातील भीमवाडी मध्ये घडली.या प्रकरणी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शकुंतला श्याम कसबे वय-58 वर्ष (रा.भिमवाडी) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, 17 मे रोजी संध्याकाळी शकुंतला या घरासमोर आलेल्या टँकरवर पाणी भारत होत्या अचानक तो टँकर पाठीमागे आला या अपघातात शकुंतला या चिरडले गेल्या. अपघात झाल्याचे कळताच अज्ञात टँकर चालक घटनस्थळावरून पसार झाला.

नातेवाईक व ग्रामस्थानी तातडीने जखमी शकुंतला यांना रुग्णालयात हलविले मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी अज्ञात टँकर चालका विरोधात एम.आय.डी.सी.सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास उप निरीक्षक मांटे करीत आहेत.

Leave a Comment