राजू शेट्टींचा विजय म्हणजे देशातील शेतकऱ्याचा विजय – योगेंद्र यादव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदारसंघातून विजयी झाल्यास तो देशातील शेतकऱ्यांचा विजय असेल, असे मत ज्येष्ठ निवडणूक विश्लेषक आणि स्वराज अभियान संघटनेचे संस्थापक योगेन्द्रसिंह यादव यांनी गुरुवारी कोल्हापूरात व्यक्त केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून गुरुवारी अर्ज भरला. त्यांच्या प्रचारासाठी योगेंन्द्रसिंह यादव कोल्हापूरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राजू शेट्टी यांनी एनडीए सोडले. हे खूप मोठे धाडस होते. शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. लोकसभेत त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी विधेयक मांडले. शेट्टी लोकसभेवर निवडून गेले तर तो केवळ त्यांच्या एकट्याचा किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय नसेल तर तो देशातील प्रत्येक शेतकऱ्यांचा विजय असेल, असेही यादव म्हणाले.

योगेंद्र यादव हे खास राजू शेट्टीं यांच्यासाठी दिल्लीवरून हजेरी लावली आहे. राजू शेट्टी हे महाराष्ट्रातील शेेतकऱ्यांचे खरे नेते आहेत असं म्हणून त्यांचं कौतुक केलं. शेतकऱ्यांचा खरा कळवळा असलेल्या या नेत्याचा विजय म्हणजे शेतकऱ्याचा विजय आहे असं ते म्हणाले. आप मधून बाहेर पडत त्यांनी स्वराज अभियान मोहीम सुरू केली.
स्वराज अभियानसाठी देशभरात ते विविध ठिकाणी कार्यक्रम घेत असतात.

 

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

शिवेंद्रराजेंना मीच निवडूण आणणार – उदयनराजे भोसले

पुरूषोत्तम जाधवांचा शिवसेनेत प्रवेश, उदयनराजे भोसलेंच्या विरोधात लढवणार लोकसभा

स्मिता आर आर पाटील यांना सांगली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्या

उदयनराजे भोसले यांच्या विरोधात तृथीयपंथी उमेदवार रिंगणात

साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा, रोहित पवारांची आजोबांना भावनिक साद

नगरमध्ये राष्ट्रवादीकडून सुजय विखेंना प्रतिस्पर्धी कोण ?

Leave a Comment