देशाची अर्थव्यवस्था आणि रोजगारावरून राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात दिवसेंदिवस वाढणारा कोरोना आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत पडणारी भर, देशाची खालावलेली अर्थव्यवस्था,रोजगाराचा प्रश्न, जीडीपीतील घसरण या मुद्यांवरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

यासंदर्भात राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. “कोरोनाविरोधातील मोदी सरकारच्या ‘सुनियोजित लढाई’ने भारताला तळागाळात नेलं आहे –
१.जीडीपीमधील ऐतिहासिक २४ टक्के घसरण
२. १२ कोटी रोजगार गेले
३. १५.५ कोटी रुपयांचे अतिरिक्त अडकलेले कर्ज
४. देशभरातील कोरोनाचे वाढलेले सर्वाधिक रुग्ण व मृत्यू….

मात्र भारत सरकार व माध्यमांसाठी ‘सब चंगा सी’.” असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment